ताज्या घडामोडी

पिकांचे त्वरित पंचनामे करा शेतकऱ्यांची मागणी. ————-

प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर

सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे निफाड तालुक्यातील वनसगाव, उगाव, सारोळा ,खडक माळेगाव ,टाकळी ,कोटमगाव, वेळापूर ,आंबेगाव ,लासलगाव, विंचूर , थेटाळे विठ्ठलवाडी या गावांमध्ये हाती आलेले पिकांचेअतोनात नुकसान झाले आहे मका सोयाबीन ,खरीप कांदा, कांदा बियाणे (उळे) द्राक्ष पिकांची नुकसान झाले त्याचबरोबर कांद्याचे बियाणे खराब झाले आहे महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे व तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे अतोनात नुकसान होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे निफाड तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या या संकटाच्या वेळी कधी धावून येणार . शेतकऱ्यांच्या अश्रू पूसतील का असा प्रश्न शेतकरी वर्ग करत आहे. तरी महसूल व कृषी विभागाने तातडीने बैठक घेऊन त्वरित पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. अशी मागणी होत आहे

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.